शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०१५

- जीवन जगायचं राहूनच गेलं

खंत होती मनात, जीवन जगायचं राहूनच गेलं
स्वच्छंदी आनंदी अन बेभान, जीवन जगायचं राहून च गेलं  

शाळा कॉलेज अन नौकरी च्या स्पर्धेत
पैसा मान आणि लौकिक कमावण्यात
जीवन जगायचं राहूनच गेलं

भूतकाळात रमण्यात  भविष्याची चिंता करण्यात
वर्तमानात  जगायचं विसरूनच गेलो
जीवन जगायचं राहूनच गेलं

शेवटी धीर करून विचारल, शेवटी धीर करून विचारलं
मी माझ्या मनाला काय झालं ? कसली खंत आहे तुला  ?
मनानं आगदी नाईलजन सांगितलं.....
विसरलास तू मला,खूप अंतर आहे आता आपल्या दोघात

कळून चुकल, कळून चुकल मनाच कधी ऐकलच नाही
यशापयशाच्या भीतीमुळे मनाला स्थान दिलेच नाही
मन बुद्धिच्या झगड्यात त्याच अस्थितव च राहिलं नाही

झालेली चूक सुधारुन  परत फुलतोय विचार  नवा  
झालेली चूक सुधारुन  परत फुलतोय विचार  नवा
नव्यानं स्वच्छंदी आनंदी अन बेभान, जीवन जगण्याचा....
नव्यानं स्वच्छंदी आनंदी अन बेभान, जीवन जगण्याचा....

मनसंवाद - श्रीपाद कुलकर्णी
#UKDiary 2015

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: